नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची सुटका केल्यानंतर 'जैश-ए-महम्मद' ही दहशतवादी संघटना भारताविरोधात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहीती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. मात्र, आता भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागली आहे.
पाकिस्तानी सेना आणि आयएसआय मिळून भारताविरोधात षडयंत्र रचत असल्याची माहिती एका इंग्रजी दैनिकाला मिळाली आहे. नियंत्रण रेषेजवल लाँचिंग पॅड तयार करून, दहशतवादी तळ उभारत पाकिस्तान दहशतवाद्यांना काश्मीरच्या गुरेज सेक्टरमधून भारतात घुसखोरीसाठी पाठवत आहे.