भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात गेल्या ३ ऑगस्टपासून मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. या आधी या मालिकेतील तीन टी ट्वेन्टी सामने भारताने आपल्या खिशात घातले असून चांगल्या फरकाने या मालिकेमध्ये वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे ही संपूर्ण मालिका जिंकण्याच्या दृष्टीने या पुढील सामने देखील महत्वाचे असतील.
आजचा सामना सुरु होण्यास फक्त ५ तास बाकी असून हा सामना प्रॉव्हिडन्स स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. संध्याकाळी ७ वाजता आजच्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होईल.