नेहा आणि शिवानीच्या वादामागचे काय आहे कारण ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2019
Total Views |


 


मुंबई
: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज नाती बदलताना दिसतात. मित्र कधी वैरी होईल, हे सांगता येत नाही. कधी कुठली गोष्ट खटकेल
?  कोणत्या बोलण्याचे वाईट वाटेल आणि दुखवला जाईल, गैरसमज होईल ? हे सांगता येत नाही. काही दिवसाआधी शिवानीने नेहाशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. जितके काम असेल तितकेच बोलायचे, जी मैत्री असेल ती बाहेर निभवायची, या घरामध्ये नाही. पण, अचानक माधवच्या घरामधून जाण्याने दोघींना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी ठरवले की आता भांडायचे नाही, आपण दोघीच आहोत एकमेकांना आणि बरेच काही. पण आता मात्र पुन्हा एकदा या दोघींमधील मैत्री तुटते की काय, असे वाटत आहे. नेहा असे काय बोलली शिवानीला, ज्याचा शिवानीला खूप राग आला. यावेळेस शिवानीने अनेक गोष्टी नेहाला बोलून दाखवल्या, तिला खटकणार्‍या न पटणार्‍या ज्या गोष्टींचा तिला राग येतो त्या सगळ्या.

शिवानी म्हणाली, "जसा तिला राग येतो तसा दुसऱ्यांनादेखील राग येतो. तिला एका विशिष्ट पद्धतीने कोणी बोलले की त्रास होतो. सगळ्यांसमोर तू मला असे नाही बोलू शकत नेहा.'' त्यावर किशोरीताई म्हणाल्या," तुम्हा दोघींच्या मैत्रीची मी मिसाल देत होते.'' त्यावर शिवानी म्हणाली, "काही गरज नाही." नेहाचे म्हणणे होते, मला काही फरक पडत नाही. मी हजारवेळा जाईन तिच्याशी बोलायला नंतरसुद्धा. त्यावर शिवानी म्हणाली, "याची अजिबात गरज नाही, याने लोकांना दाखवशील की बघा मी किती चांगली आहे. हेच केलेस तू माधवच्या बाबतीत." नेहाचे म्हणणे पडले,"मला यावरती काहीच बोलायचे नाही."... आणि शिवानी - नेहामधील वाद वाढतच गेला. शिवानी म्हणाली की, "तुझ्याकडे बोलायला काही नाहीये." त्यावर नेहाचा आवाज चढला आणि ती म्हणाली मला माहिती आहे मी काय केले आहे. माझ्या आणि माधवबद्दल तू काही बोलू नकोस." यावर शिवानी म्हणाली, "म्हणून तो बाहेर गेला. तू त्याला सारखे बोलायला लावलेस. रडायचे नाटक केलेस, मलाच तुम्ही किती बोलता, माझे कसे खरे आहे, मी किती बिचारी आहे, माधव किती बोलतो मला हे चित्र तू बनवलेस नेहा." हा वाद कुठवर जाईल ? यावर नेहाचे म्हणणे काय असेल ? जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी.

@@AUTHORINFO_V1@@