मुंबई : ऐन सणांच्या दिवशी सोने तसेच चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरात विलक्षण वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने ३७ हजारांचा आकडा पार केला आहे. तसेच, चांदीचा दरदेखील ४४ हजारांच्या वर पोहोचला आहे. गणपती, दिवाळीसारखे सण जवळ आले असताना हे दर वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये निराशेचे वातावरण दिसत आहे.
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे भारतातील सोने, चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, सोन्याचा भाव आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचला आहे. वाढत्या मागणीमुळे चांदीही हजार रुपयांनी वाढून ४३,१०० रुपये प्रति किलो झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळेदेखील सोने महागले आहे.