हुश्श... वाहतूक कोंडी टळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |



मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची प्रवासी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाळू, रेती भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी दिली.

 

रावते यावेळी म्हणाले, "गणेशोत्सव काळात मुंबई परिसरातून कोकणात जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या काळात एसटी महामंडळानेही कोकणातील विविध भागात जाण्यासाठी अधिक बसेसची व्यवस्था केली आहे. गणेशभक्तांचा हा प्रवास वाहतुकीच्या कोंडीशिवाय सुखकर आणि सुरक्षीत होण्याच्या दृष्टीने या काळात गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी करण्यात येत आहे. मात्र ही निर्बंधबंदी दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्विड मेडीकल ऑक्सीजन व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसेल," असे ते म्हणाले.

 

या काळात बंदी लागू

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर दिनांक ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत तसेच १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या कालावधीत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहील. तसेच ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर व ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनक्षमता असलेल्या (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर इत्यादी) वाहनांना सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस पूर्णत: बंदी राहील. या कालावधीत नमूद वाहनांना रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास परवानगी राहील.

@@AUTHORINFO_V1@@