कोकणवासीयांसाठी खुशखबर ! आता गणपतीत टोल माफ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा त्यांनी सोमवारी घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी. पी. जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे श्री देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढे सांगितले की, "यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई -कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे."

@@AUTHORINFO_V1@@