नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी विरोधकांना टोला लगावत राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली. देशामध्ये संविधान लागू झाल्यापासून तब्बल ६९ वर्षांनंतर कलम ३७० रद्द करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनादेखील कलम ३७० मान्य नव्हते. नेहमीच देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले आहेत. ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील जीवन पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागेल. अशात राहुल गांधींचे किंवा अन्य पक्षांच्या नेत्यांचे काश्मीर दौऱ्यावर जाणे जरा आततायीपणाचे नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.