पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती संस्थानाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा, यासाठी वेळ वाढवून देण्याचा आणि विसर्जन मिरवणुकीत रात्रभर वाद्य वाजवू देण्याची मागणी गणेश मंडळाकडून केली जात आहे. यासंदर्भात मी प्रशासनाशी चर्चा करेन. त्यातून कायदेशीर आणि व्यावहारिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला थोडा वेळ द्या. हे प्रश्न फक्त गुन्हे दाखल करून नव्हे तर प्रबोधनातून सुटतील.
दरम्यान, गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी दिवसांची मर्यादा वाढवावी तसेच विसर्जन मिरवणुकांसाठी रात्री १२ नंतरही वाद्य वाजवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी दिली.