पी.चिदंबरम यांचे भवितव्य सरन्यायाधीशांच्या हातात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |


 अटकपूर्व जामिनावर सरन्यायाधीश रंजन गोगोई घेणार निर्णय

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा जमीन अर्ज काल फेटाळला. यामुळे चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे असतानाच सर्वोच्च न्यायालायाकडूनही चिदंबरम यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी या प्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले असल्याने आता चिदंबरम यांचे भवितव्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या हाती आहे. सरन्यायाधीश सध्या अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेत आहेत. यानंतर ते चिदंबरम यांच्या जमीन अर्जावर विचार करतील.

 

 
आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ साली आयएनएक्स मीडियाने ३०५ कोटी रुपयांचे परदेशी भांडवल मिळवले होते. यासाठी आवश्यक असणाऱ्या एफआयपीबीच्या मंजुरीमध्ये अनियमितता आढळून आली होती. सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याचा या प्रकरणात हात असल्याचे समोर आले होते. यानंतर कार्ती याला अटक करण्यात आली होती, तर १५ मे, २०१७ रोजी चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा निकाल २५ जानेवारी रोजी राखीव ठेवण्यात आला होता. परंतु काल याबाबतची याचिका फेटाळण्यात आली. दरम्यान, अटकेपासून वाचण्यासाठी चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणावर सरन्यायाधीश गोगोई काय निकाल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@