इव्हीएम अत्यंत सुरक्षित! अफवांवर विश्वास ठेऊ नका : मुख्य निवडणूक अधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (इव्हीएम) तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित असून ती कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही तसेच त्यांच्या सुरक्षेचा भंग करणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी इव्हीएमविषयी पसरविण्यात येणार्‍या अफवांवर विश्वास ठेऊ नये,” असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी केले आहे.

 

इव्हीएम अत्यंत सुरक्षित असल्याचा विश्वास बाळगण्याविषयी आवाहन करताना मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी माहिती दिली की, “इव्हीएम चुकीचे मत नोंदवू शकत नाही, यावर विश्वास ठेवण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांची माहिती करून घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक-२०१९ दरम्यान देशातील ६१.३ कोटी मतदारांनी १० लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्रांवरून इव्हीएमच्या साहाय्याने मतदान केले आणि व्हीव्हीपॅटवर त्यांनी केलेल्या मतदानाची खात्री केली.


 

 

प्रत्येक इव्हीएम राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तपासली आणि सीलबंद केली जाते. तसेच त्यांचे प्रतिनिधी मशीनच्या सीलवर स्वाक्षरी करतात. इव्हीएम यंत्रे सर्व मतदारसंघ आणि मतदान केंद्रांना सरमिसळ करून वाटप करण्यात येत असल्यामुळे कोणती मतदान यंत्रे कोणत्या मतदान केंद्रात पाठविली जाणार याविषयी पूर्वकल्पना नसते. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीनंतर त्या दिवशी निश्चित होते. तोपर्यंत उमेदवाराला इव्हीएमवरील कोणत्या क्रमांकाचे बटण दिले जाईल, याचाही अंदाज बांधता येत नाही.

 

“२०,६८७ व्हीव्हीपॅटमधील मतांची संबंधित इव्हीएममधील मतांशी तुलना केली असता फक्त ८ व्हीव्हीपॅटमधील एकूण मतांची जुळणी झाली नाही. तसेच सुमारे १.२५ कोटी मतांच्या गणनेत केवळ ५१ मते (एकूण मतदानाच्या ०.०००४ टक्के) जुळली गेली नाहीत आणि ही गफलत मानवी चुकांमुळे झाली असून मशीनमध्ये काही दोष आढळला नाही. इव्हीएम मशीनचा प्रशासकीय आणि सुरक्षेविषयी अत्यंत बळकट प्रोटोकॉल असून त्याचा कोणीही भंग करू शकत नाही. आपण लोकसभा मतदानाच्या वेळी नोंदविलेल्या मताची खात्री व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठीद्वारे केली आहेच. त्यामुळे नागरिकांनी इव्हीएमविषयी कोणत्याही अफवांना बळी पडू नये,” असेही प्रसिद्धीपत्रकान्वये आवाहन करण्यात आले आहे.



 
 
@@AUTHORINFO_V1@@