'मुंबई तरुण भारत'च्या दिवाळी अंकास 'मराठी वृत्तपत्र लेखक संघा'चा पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2019
Total Views |

 


मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून यामध्ये दै. 'मुंबई तरुण भारत'च्या दिवाळी अंकास 'प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक' पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे व प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. गुरुवार, दि. २२ ऑगस्ट रोजी ७० व्या वृत्तपत्र लेखक दिनाचे औचित्य साधत या पुरस्कारांचा वितरण समारंभ होणार आहे. सदर दिवशी सायंकाळी ५.३० वाजता ताडदेव, मुंबई (मुंबई सेन्ट्रल रेल्वेस्थानक -पश्चिम) येथील रूसी मेहता सभागृह, जनता सेवा केंद्र येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास दै. नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर हे अध्यक्ष म्हणून तर मुंबई मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

दै. 'मुंबई तरुण भारत'च्या दिवाळी अंक - २०१८ चे संपादन मुंबई तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विजय कुलकर्णी यांनी केले आहे. या अंकामध्ये राजकारण, समाजकारण, पर्यावरण, इतिहास, विकासात्मक धोरणे, राष्ट्रीय सुरक्षा, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान, प्रवासवर्णने, ललित लेख, कविता आदी क्षेत्रांतील विविध विषयांवर त्या त्या विषयातील तज्ज्ञ व मान्यवरांनी लेखन केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@