आजवर अमृता फडणवीस यांनी अनेक सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील जलसंधारणासाठीदेखील त्यांनी मोठा हातभार लावला आहे. तसेच मानवतेची सेवा, जपवणूक आणि शांतता ही मूल्ये प्रस्थापित केल्याबद्दल फडणवीस दाम्पत्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विश्वशांती रक्षक आंदोलन ही एक सोशल मीडियावरील चळवळ आहे. यात जगभरातील २ लाखांहून अधिक लोक जोडले गेले आहेत. हे आंदोलन क्षमाशीलता, कृतज्ञता, प्रेमभाव, विनम्रता, दातृत्व, धैर्यशीलता आणि सत्य या सात शांतिमूल्यावर कार्य करते. माणुसकीच्या भावनेने शांतता प्रस्थापित करणे या विचारधारेवर हे आंदोलन कार्य करते.