पाकिस्तानचे नापाक कृत्य, सीमावर्ती भागांत गोळीबार : जवानांनी दिले चोख प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |



 

श्रीनगर : भारतात स्वातंत्र्यदिनाचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच पाकिस्तानच्या लष्कराने गुरुवारी पुन्हा एकदा नापाक कृत्य केले. पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी पूँछमधील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. भारतीय लष्करही सतर्क असून, जवानांनी पाकिस्तानकडून होणारे घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर आज पुन्हा पूँछ जिल्ह्यातील केजी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.

 
@@AUTHORINFO_V1@@