प. महाराष्ट्रासह कोकणात जाणाऱ्या खासगी बस रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |



कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खासगी बस मालकांनी खासगी बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग सहाव्या दिवशीही कोल्हापूर, सांगलीमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी कोणताच मार्ग उपलब्ध राहिलेला नाही. जोपर्यंत पूरस्थिती कमी होत नाही, रस्त्यावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत या गाड्या बंद राहतील, असं खाजगी बस मालक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

 

राज्यात पश्चिम महाराष्ट्रासोबतच कोकणात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मुंबईहून सातारा, सांगली, कोल्हापूरकडे याशिवाय कोकणात आणि गोव्याकडे जाणाऱ्या सर्व खाजगी बस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण भागात जाणाऱ्या रोजच्या १०० खाजगी बस रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई ते कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे जाणाऱ्या ३०० गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई ते बंगलोर, बेळगाव या मार्गावरच्या ३०० गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई ते गोवा मार्गावरही २०० गाड्या रद्द केल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@