...हे तर रणछोड गांधी ! : शिवराज सिंह यांचा राहुल गांधी यांना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2019
Total Views |




नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच कर्नाटकमधील 11 आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने तिथे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

काँग्रेसमधील या परिस्थितीवरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींना रविवारी टोला लगावला. “राहुल गांधी हे रणछोड गांधी बनले आहेत. ते मैदान सोडून पळाले असून, त्यांच्या आमदारांचीही पळापळ सुरू आहे,” असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

 

काँग्रेसमधील सद्यस्थितीवर भाष्य करताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ”काँग्रेसमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. त्यांचे स्वत:चेच लोक पक्ष सोडून पळत आहेत. आता त्यांचे सरकार त्यांच्याच कर्माने कोसळणार असेल तर त्याला आम्ही काय करणार?, कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्याची कुठलीही तयारी आम्ही केलेली नाही. सरकार अल्पमतात आहे, हे आम्ही सांगू शकत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तर आता रणछोड गांधी बनले आहेत. ते स्वत: मैदान सोडून पळाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आमदारांचीही पळापळ सुरू आहे.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@