सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाने आणखी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. आज २६ जुलैला देशभरात साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहीद जवानांच्या मुलांच्या 'केजी टू पीजी' शिक्षणाचा खर्च उचलण्याचा हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
यापूर्वीदेखील तिवरे धरण दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्यांची घरे आणि गावातील शाळादेखील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट बांधून देण्याचा निर्णय झाला आहे.