राज्य शासनाने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी शहीद कुटुंबियांना सन्मानपूर्वक शासकीय कार्यक्रमांना बोलावण्याची पद्धत सुरु केली. ऑपरेशन विजयमध्ये पाकिस्तानला वाटले होते की, भारतीय सैनिक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. पण भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ऑपरेशन विजय यशस्वी केले. त्यामुळेच ऑपरेशन विजय हा शौर्याचा अभिलेख आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांना देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘देशभरात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजयाला २० वर्ष पूर्ण होत असून आपल्या भारतासाठी आज गौरवाचा दिवस आहे. आजच्या दिवशी ऑपरेशन विजयमध्ये शहीद झालेल्या शहिदांचे बलिदान आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे’.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat