सोनभद्र हत्याकांडासाठी कॉंग्रेस जबाबदार : योगी आदित्यनाथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |



लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनभद्र हत्याकांडासाठी कॉंग्रेस जबाबदार असल्याचा हल्लाबोल केला. या घटनेचे मुळ १९५५ मध्ये रोवले गेले होते. त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. या प्रकरणाला १९५५ आणि १९८९ मधील तत्कालीन उत्तर प्रदेशचे कॉंग्रेस सरकार जबाबदार असल्याचे म्हटले. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून राहण्याचे निर्देश पोलीसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.


 

ते म्हणाले, "ग्राम पंचायतीची जमीन १९५५ मध्ये आदर्श सोसायटीच्या नावावर नोंदणीकृत होती. या जमिनीवर वनवासी समाज शेती करत होता. त्यानंतर १९८९ एका व्यक्तीने ही जमिन स्वतःच्या नावे केली. त्यावेळी असलेल्या सरकारच्या कार्यकाळातच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी नेमलेल्या समितीला १९५२ पासून तपास करण्यास सांगितला आहे."

 

या संबंधित एसडीएम घोरावाल, सी.ओ. घोरावाल यांच्यासह अन्य सर्व शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवरही कडक कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. अटक आरोपींची संख्या आत्तापर्यंत २७ झाली आहे.

 

नेमके प्रकरण काय वाचा सविस्तर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@