निर्यात वाढीला चालना देण्यासाठी निर्यात पत वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे - पियुष गोयल

    07-Jun-2019
Total Views | 30



नवी दिल्ली : कोणत्याही व्यापारासाठी वेळेवर आणि तत्पर निर्यात पत उपलब्धता महत्वाची असून निर्यात वाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाचा घटक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. निर्यात पत या संदर्भात एफआयईओ, जेम ॲन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सील यासारख्या निर्यात संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींशी गोयल यांनी आज नवी दिल्लीत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

 

अनुदानावर अवलंबून न राहता निर्यातदारांना स्वस्त पतपुरवठा सहज उपलब्ध करुन देण्याकडे वळण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात निर्यात पतपुरवठ्याचा हिस्सा कमी झाला असून ही चिंतेची विशेषत: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

 

निर्यात पतपुरवठा या संदर्भातल्या महत्वाच्या आव्हानांची दखल घेऊन संबंधित संस्थांकडून विचार घेऊन त्याआधारे त्याचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. वित्त मंत्रालय, रिझर्व बँक, स्टेट बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा, ॲक्सीस बँक, बँक ऑफ अमेरिका, फिक्की, सीआयआयचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121