नवी दिल्ली : बालाकोट एअर स्ट्राईकची अचूक व यशस्वी योजना आखणारे सामंत गोयल यांची रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच 'रॉ'च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जम्मू काश्मीर विषयातील तज्ञ मानले जाणारे अरविंद कुमार यांच्यावर आयबीच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या दोघांची निवड केली असून लवकरच हे आपला पदभार स्वीकारणार आहेत.
सामंत गोयल यांनी बालाकोट एअर स्ट्राईकची आखणी आणि नियोजन केले होते. तर अरविंद कुमार हे आसाम-मेघालय केडरचे आयपीएस अधिकारी असून अनेक वर्षांपासून आयबीसाठी ते काम करत आहेत. 'रॉ' ही शत्रूराष्ट्रांच्या कारवायांवर लक्ष ठेवणारी गुप्तहेर संस्था आहे तसेच 'आयबी'वर देशांतर्गत हिंसाचार, देशविरोधी कारवायांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat