बंगालमधील डॉक्टरांचा संप मागे

    17-Jun-2019
Total Views | 27



कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवड्याभरापासून संपावर गेलेल्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व मागण्या मान्य केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

 

सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसोबत प्रदीर्घ बैठक घेतली. या बैठकीत ममतांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता बॅनर्जी यांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना शहरातील प्रत्येक रुग्णालयात एक पोलीस अधिकारी तैनात करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक सरकारी रुग्णालयात तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. बैठकीला सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. ममतांनी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस पाऊल उचलल्याने डॉक्टरांनी समाधान व्यक्त करत संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

कोलकातातील मंत्रालयाजवळ असलेल्या एका सभागृहात ही बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीचे लाइव्ह कव्हरेज करण्यासही ममतांनी परवानगी दिली होती. दरम्यान, पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप आजपासून देशव्यापी झाला. देशभरातील ५ लाख डॉक्टर संपात उतरले. त्याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121