वऱ्हाडी मंडळींसोबत नवदांपत्याचे मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |



बदलापूर : लग्न सोहळा पार पडताच वाजंत्री आणि वऱ्हाडी यांच्यासमवेत नवदाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावला. वृषाली गाडे आणि शिवाजी पाटील असे या नवदांपत्याचे नाव असून बदलापूरच्या भोई सावरे गावात त्यांनी आपला हक्क बजावला. या नवदाम्पत्यासोबतच वऱ्हाडी मंडळींनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे राजकीय गरमागरमीत हा अनोखा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

वृषाली गाडे आणि शिवाजी पाटील यांनी अक्षदा पडल्यानंतर लग्नाच्या इतर विधीची वाट न पाहता वऱ्हाडी मंडळींसोबत वाजत गाजत मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी लग्न लागल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भोई सावरे येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. दरम्यान, या नवदाम्पत्याने समाजासाठी एक आदर्श घालून दिला असून त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@