ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकूण २३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेनेने येथून विद्यमान खासदार राजन विचारेंना तिकीट दिले आहे, तर आनंद परांजपे काँग्रेसचे उमेदवार आहेत. वंचित आघाडीनेही येथे मल्लिकार्जुन पुजारींना उभे केल्याने चुरस वाढली आहे.
ठाणे शहरात परप्रांतीयांचे प्रमाण वाढत चालले आहे. यासोबतच वाहतूक कोंडीच्या समस्येनेही उग्ररूप धारण केले आहे. मतदारसंघात सार्वजनिक सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हक्काच धरण हा ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. शासकीय रुग्णालयातील अव्यवस्था, तसेच क्लस्टर, मेट्रो, खाडी पर्यायी मार्ग, कळवा आणि घणसोली प्रस्तावित खाडी पूल हे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat