
नवी दिल्ली : भारत सरकारच्या सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करणार आहे. त्यासाठी ६१३ कोटी ९६ लाखांचे नीधी मंजूर करण्यात आला आहे. यातून सीआरपीएफ आणि बीएसएफसाठी माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) १६ कोटी ८४ लाखांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. या निधीतून रिमोटने चालणारी सात वाहने (आरओव्ही) विकत घेतली जाणार आहेत. या गाड्यांमुळे सुरक्षादलांना नक्षलवादी तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या एलईडी हल्ल्यांना अधिक सक्षमपणे उत्तर देता येईल.
आरओव्हीची (Remotely Operated Vehicle) वैशिष्ट्ये : या गाड्यांच्या मादतीने इमारती, बस, मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांमध्ये जवानांच्या उपस्थितीशिवाय एलईडी निकामी करता येऊ शकणार आहे. या गाड्या पंधरा डिग्रीमध्ये शिड्या तसेच चढ उतार असणाऱ्या ठिकाणी आठ किलोपर्यंतचे वजन घेऊन जाऊ शकता आहे. या गाड्यांवर एमएमजी गन, एमपी फाइव्ह हत्यारे आणि शॉर्टगन सारखी हत्यारे लाव ण्याची सोय आहे. या गाड्यांवरील कॅमेरासारख्या सिस्टीमुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर रिमोटने ती चालवणाऱ्यांना थेट केबिनमध्ये दिसण्याची सोय, यात एक्स रे स्कॅनर्सचीही सोय उपलब्ध असणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat