प्रचाराच्या तोफा थंडावल्या; १८ एप्रिलला मतदान

    16-Apr-2019
Total Views | 42



नवी दिल्ली : २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील दहा तर इतर राज्यातील ८७ लोकसभा मतदार संघांतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून अनेक दिग्गज उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्रचार करताना दिसून आले.

 

दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्येही दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

 

दुसऱ्या टप्प्यासाठी १६२९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद होणार असून एकूण १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदार आपले कर्तव्य बजावणार आहेत. दरम्यान, मतदान सुरळीत होण्यासाठी १ लाख ८१ हजारहून अधिक मतदान केंद्रावर मतदान होणार असून येत्या २३ मे २०१९ रोजी निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121