तापली मुंबई ! मुंबईचा पारा चाळीशी पार...

    25-Mar-2019
Total Views | 54



मुंबई : होळीनंतर मुंबईत तापमानाचा पारा वाढू लागला आहे. रविवारी ३७ अंश सेल्सिअसपर्यंत असणाऱ्या तापमानाने सोमवारी दुपारी ४० अंश सेल्सिअस तापमान गाठले. मंगळवारीदेखील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत दुपारी १२ वाजताचे तापमान ४० अंश सेल्सिअस असल्याचे वृत्त 'स्कायमेट'ने दिले. आजचे तापमान वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा आणखी १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारपासूनच मुंबईकरांना तापमानातील फरक जाणवायला लागला आहे. मुंबईत गेल्या संपूर्ण आठवड्यात किमान तापमान सांताक्रूझ येथे २१.२ तर कुलाबा येथे २३ अंशांवर होते. मुंबईचे कमाल तापमान शनिवारी ३४.१ अंशांपर्यंत पोहोचले. यात रविवारी लक्षणीय वाढ झाली. सांताक्रूझ कमाल ३७.८ आणि किमान २२.५, तर कुलाबा येथे कमाल ३३.५ तर कमाल २४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच वाढलेल्या तापमानाने मुंबईकरांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थतेची जाणीव झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात तापमान २ ते ३ अंशांनी वाढले आहे. पूर्वेकडील उष्ण वार्‍यांनी मध्य महाराष्ट्रसह मुंबई परिसराचाही पारा वाढला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121