नवी दिल्ली : सुदानमधील सिरेमिक कारखान्यात एलीपी
टँकरचा स्फोट झाला आणि १८ भारतीयांसह २३
जण ठार झाले. या अपघातात १३० हून
अधिक लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या घटनेत सुदानमधील भारतीय दूतावासाने
भारतीयांच्या मृत्यूची नोंद केली. मात्र, त्यांनी मृतांची संख्या दिली नाही.
याबाबत माहिती देताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले, “आम्हाला नुकतीच ही वाईट माहिती मिळाली आहे. सुदानची राजधानी खार्तूमच्या हद्दीत 'सलूमी' नावाच्या टाइल बनवण्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे.”