सेनेला गाजर दाखवून तिघाडी सरकार राज्याच्या डोक्यावर बसवले : अतुल भातखळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले. बऱ्याच नाट्यमयी घडामोडीनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी गाठ बांधून सरकार स्थापन केले. त्यानंतर विरोधकाच्या बाकावर बसलेल्या भाजपकडून सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात झाली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली.

 

"शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवून शरद पवार यांनी काँग्रेसला सोबत घेतले. त्यांनी महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा अपमान करत तिघाडीचे सरकार राज्याच्या बोकांडी बसवले. तसेच, शरद पवारांच्या मते १०५ जागा मिळवणा-या फडणवीसांना जनतेने नाकारले. मग, ५०-५५ जागा मिळवणा-या तुमच्या पक्षाला लाथाडले असेच म्हणावे लागेल." अशा शब्दांमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला.

 

अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोबाबत घेतलेल्या निर्णयावरूनही राज्य सरकारवर निशाणा साधला. "मेट्रोसारखे जनोपयोगी प्रकल्प बंद करून मत्सालयाचा घाट घालणे म्हणजे तिघाडी सरकारची निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे बंद करा." असे ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@