मुंबई : भारती एअरटेल नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल दरांच्या किंमतीत वाढ करत आहे. एअरटेलतर्फे सलग दुसऱ्यांदा मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कंपनीने आपल्या सर्व बेस रिचार्जच्या किंमती बदलून नव्या किंमत आजपासून लागू केल्या आहेत. एअरटेल नेटवर्कसोबत जोडून राहायचे असल्यास किमान ४५ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची असणार आहे. पूर्वी हा रिचार्ज ३५ रुपयांचा होता.
कॉलिंगसाठी कमीत कमी १.५० रुपये प्रति मिनिट द्यावे लागणार आहे. अर्थात २.५ पैसे प्रति सेकंद द्यावे लागणार. सोबतच एसएमएस साठी १ रुपया व एसटीडी एसएमएससाठी दीड रुपये मोजावे लागणार आहे. चार डिसेंबरला टेलिकॉम कंपनीने सर्व प्लॅनच्या किंमतीत ४० टक्क्यांची वाढ केली होती. आता दुसऱ्यांदा एअरटेलने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. भारती एअरटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल रेटच्या किंमतीमध्ये वाढ करत आहे. एअरटेलने दुसऱ्यांदा आपल्या मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ केली.
कंपनीने आपल्या सर्व बेस रिचार्जच्या किंमती बदलून नवी किंमत सोमवार, दि. ३० डिसेंबरपासून लागू केली. एअरटेल नेटवर्कसोबत जोडून राहायचे असल्यास किमान ४५ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची असेल. पूर्वी हा रिचार्ज ३५ रुपयांचा होता. कॉलिंगसाठी कमीत कमी १.५० रुपये प्रति मिनिट द्यावे लागणार, अर्थात २.५ पैसे प्रति सेकंद कॉल दर असणार आहे. सोबतच एसएमएससाठी एक रुपया व एसटीडीसाठी दीड रुपये द्यावे लागणार. चार डिसेंबर रोजी टेलिकॉम कंपनीने सर्व प्लॅनच्या किंमतीत ४० टक्क्यांची वाढ केली होती. आता दुसऱ्यांदा एअरटेलने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे.