आदल्या दिवशी चषक जिंकला, दुसऱ्या दिवशी चढला बोहल्यावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2019
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेने सोमवारी तामिळ अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत विवाह केला. मनीषने रविवारी आपल्या कर्नाटक संघाला दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. त्याने सुरतमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडूविरुद्ध ४५ चेंडूचा सामना करताना ६० धावांची खेळी केली. या रोमहर्षक सामन्यामध्ये मनीषच्या कर्नाटक संघाने अश्विनच्या तामिळनाडू संघाला अवघ्या १ धावाने विजय मिळवला आणि चषक आपल्या नावे केला. त्यानंतर मनीषने सामन्यानंतर मुलाखतीत आपल्या विवाहाबद्दल सर्वांना माहिती दिली.

 

मनीष पांडे याने सय्यद मुश्ताक अली चषक जिंकून दुसऱ्याच दिवशी बोहल्यावर चढल्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. महिनाभरापूर्वी मनीष पांडे व अभिनेत्री अश्रिता शेट्टी या दोघांच्या लग्नावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. मनीष पांडेच्या कुटुंबाने या चर्चेला दुजोरा देत या दोघांचे २ डिसेंबर रोजी विवाह असल्याची माहिती दिली होती. सोमवारी रोजी मुंबईत मनीष पांडे आणि अश्रिता हे दोघे पवित्र बंधनात अडकले. याचा विवाह सोहळा तब्बल २ दिवस चालला.

@@AUTHORINFO_V1@@