घराणेशाहीला युवकांचा विरोध ! : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2019
Total Views |


pm_1  H x W: 0


नवी दिल्ली : “आज २१व्या शतकातील युवकांचा व्यवस्थेवर विश्वास आहे, मात्र जर व्यवस्थेने योग्य पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला नाही, तर ते अस्वस्थ होतात आणि मोठ्या हिमतीने ते व्यवस्थेला प्रश्न विचारतात आणि हे अतिशय योग्य असल्याचे मी मानतो. मात्र, देशाचे युवक अराजकतेच्या बाजूने नाहीत, हे निश्चित. अव्यवस्था आणि अस्थिरतेबाबत त्यांच्या मनात चीड आहे. ते घराणेशाही, जातीयवाद, आप-पर, स्त्री-पुरुष भेद अशा गोष्टींच्या ते विरोधात आहेत,” असे सूचक वक्तव्य रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.



२०१९या सरत्या वर्षाच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मोदी यांनी रेडिओवरील
‘मन-की-बात’ कार्यक्रमामधून देशवासीयांसोबत संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (एनआरसी) होत असलेल्या हिंसक आंदोलनांच्या संदर्भात पंतप्रधानांचे हे वक्तव्य फार महत्त्वाचे मानले जात आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी म्हणाले, “ज्यांचा जन्म २१ व्या शतकात झाला आहे, असे युवक येणार्‍या दशकाला गती देण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका निभावतील. महत्त्वाची भूमिका घेणारे युवक हे मुद्दे समजून घेतच लहानाचे मोठे झाले आहेत. अशा सर्व युवकांना अनेक नावांनी ओळखले जाते. काही लोक त्यांना मिलेनियल म्हणतात, तर काही त्यांना ‘झेड’ किंवा ‘जनरेशन झेड’ या नावाने ओळखतात. ही सोशल मीडिया पिढी आहे, ही गोष्ट तर प्रत्येकाच्या डोक्यात चांगलीच ठसलेली आहे. आमची ही पिढी अतिशय प्रतिभावान आहे, याचा अनुभव आम्हाला येतच आहे. काही तरी वेगळे करण्याचे या युवकांचे स्वप्न असते,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणार्‍या युवकांचे वर्णन केले.



पंतप्रधान मोदी आपल्या
मन की बात’मध्ये पुढे म्हणाले की, “या पिढीचा स्वत:चा एक विचार आहे. सध्याच्या काळात देशातील युवक व्यवस्थेच्या बाजूने आहेत, ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा व्यवस्थेवर विश्वास आहे, मात्र, जर व्यवस्थेने योग्य पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला नाही, तर ते अस्वस्थ होतात आणि मोठ्या हिमतीने ते व्यवस्थेला प्रश्न विचारतात आणि हे अतिशय योग्य असल्याचे मी मानतो. मात्र, देशाचे युवक अराजकतेच्या बाजूने नाहीत, हे निश्चित. अव्यवस्था आणि अस्थिरतेबाबत त्यांच्या मनात चीड आहे. ते घराणेशाही, जातीयवाद, आप-पर, स्त्री-पुरुष भेद अशा गोष्टींच्या विरोधात आहेत, ” असे ते म्हणाले.



‘विवेकानंदांचा या पिढीवर विश्वास’

जेव्हा विमानतळांवर किंवा सिनेमागृहांमध्ये रांग तोडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा याला सर्वात प्रथम विरोध युवकच करत असतो. ही एक नव्या प्रकारची व्यवस्था आहे. नव्या प्रकारचे युग आहे. आज भारताला याच पिढीकडून अपेक्षा आहेत. स्वामी विवेकानंद यांना याच युवा पिढीवर विश्वास होता. यातून माझे कार्यकर्ते निर्माण होतील,” असे मोदी पुढे म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@