मुंबई : वर्ष २०१० - २०१९ या दशकातील शेवटचे सूर्य ग्रहण गुरुवारी सकाळी ८:०४ वाजता सुरु झाले.
हे मुंबई, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, म्हैसूर, कन्याकुमारी सह देशाच्या अनेक शहरात पाहण्यात आले.
जास्तीत-जास्त ठिकाणी खंडग्रास आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसले.
भारतामध्ये ग्रहणाचा कालावधी २.५२ तासांचा होता. सकाळी ९:३० वाजता मध्य काळ आणि सकाळी १०:५६ वाजता ग्रहण संपले.