मुंबई : नुकतेच काही व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये सरकरकडून बदल करण्यात आले. सचिन तेंडुलकरसह काही महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये घट करण्यात आली. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना 'झेड' सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावर आक्षेप घेत निलेश राणे यांनी शिवसेनेच्या सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना झेड सुरक्षा कशी? असा खडा सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने १० रुपयाच्या थाळीची घोषणा केल्यापासून निलेश राणे यांनी टीकेचा सूर चालू ठेवला होता. आता १० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.