कर्जमाफी जाहीर, पण फायदा कोणाला? : राजू शेट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नागपूर : शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. मात्र, यावर आक्षेप घेत 'दोन लाखांच्या कर्जमाफीने हे आश्वासन पूर्ण होत नाही.' असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

 

"या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सरकारने सातबारा कोरा करण्याच्या आश्वसानाची पूर्तता होत नाही. खर तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २ लाखांच्या कर्जमाफीने हे आश्वासन पूर्ण होत नाही. ३० सप्टेंबरपर्यंतचे जे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक पाहता मागील वर्षभरात विशेषता दुष्काळ व त्यांनतर अतिवृष्टी, नापिकी, महापूर यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस व महापुरामुळे ज्या पिकांचं नुकसान झाले आहे. त्या पिकांवर काढलेलं जे पीक कर्ज आहे. त्या पीक कर्जाची मुदतच मुळात ३० जून रोजी संपते. त्यामुळे ३० जूनच्या अगोदर थकबाकी जाण्याचा प्रश्नच येत नव्हता, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

"ज्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पिकांवर ना नुकसानभरपाई मिळाली, ना कर्जमाफीचा त्यांना फायदा मिळाला. त्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, जे उद्धवस्त झाले ते वंचित राहिले. त्यामुळे नेमकी ही कर्जमाफी कोणाला मिळणार आहे?, हे मला माहिती नाही. परंतु आकडेवारी तपासावी लागेल. नेमके यात किती लाभधारक येतात. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जर ही कर्जमाफी असेल, तर मुळात नुकसान झालेले शेतकरी बसतच नाही." असे देखील शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@