तमिळनाडून भिंत कोसळून १५ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |



तमिळनाडू : शहरात दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने एकूण १५ जणांचा बळी घेतला आहे. तमिळनाडूतील नाडूर भागात भिंत कोसळून १५ जण ठार झाले आहेत. ढीगाऱ्याखाली आणखी काही लोक असण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न बचावपथकाद्वारे करण्यात येत आहेत.

 

नाडूर भागात घराभोवती असलेली भिंत सोमवारी सकाळी कोसळली. यात तीन घरांचे मोठे नुकसान झाले. अन्य काहीजण ढीगाऱ्याखाली अडकले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे. हवामान खात्याने एकूण सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केले आहेत. सोमवारपासून शाळा महाविद्यालयांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने ठिकठिकाणचा संपर्क तुटला आहे.


@@AUTHORINFO_V1@@