नागपूर : 'जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्या ठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावे !', असा जाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
'जामिया विद्यापीठातील हिंसाचारावर टीप्पणी करताना उद्धव ठाकरे यांनी पोलीसांनी जालीयनवाला बाग हत्याकांडात ज्या प्रमाणे पोलीसांनी कारवाई केली होती, त्यानुसार, जामिया विद्यापीठात पोलीस वागले.' या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, "विद्यार्थी हे युवा बॉम्ब सारखे असतात. विद्यार्थ्यांसोबत असे करू नका. जे आत्ता केंद्र सरकार करत आहे." उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे संतत्प प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत.