ओविसी म्हणजे नव्या भारताचे जिन्ना : संबित पात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : "संसदेत बहुमताने सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर देशातील काही भागात हिंसक आंदोलन होत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष जबाबदारीने वागत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. औवेसी देशाचे नवे जिन्ना आहेत.", असे आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहेत.

 

"देशात जे हिंसक आंदोलन सुरु आहे त्याला काँग्रेस जबाबदार आहे. शनिवारी रामलीला मैदानावर राहुल गांधी यांचे 'रिलॉन्चिंग' करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिंसक आंदोलन भडकले." असा आरोप संबित पात्रांनी केला. "ओवैसी नव्या जिन्नांसारखे देशात काम करत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी नेते अमानतुल्लाह खान आहेत ज्यांना दिल्लीतील जिन्ना बनायचे आहे. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, बंगालमध्ये राहणाऱ्यांना बंगाली भाषा बोलावी लागेल. मात्र, आता हिंदीमध्ये पूर्ण भाषण करत आहेत. पूर्ण देशात वातावरण बिघडावे असे त्यांना वाटते का?." असा सवाल भाजपने केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@