नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधायक लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेतही मंजूर झाले. परंतु, यावरून आसाममध्ये अनेक दिवसापासून निदर्शने सुरु आहे. "आसाममधील नागरिकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो की, कोणीही तुमचे हक्क, तुमची ओळख आणि तुमची सुंदर संस्कृती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही." असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामवासीयांना दिला आहे. आसाममधील चाललेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी त्यांना ट्विटरवरून हे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधायक संमत केले. मोदी सरकारचे गेले ६ महिन्यात हे तिसरे मोठे यश आहे.