रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्क्यांची वाढ अपेक्षित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2019
Total Views |




मुंबई : “राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये २२ टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे ६९.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. २ लाख, ३ हजार, ७७२ क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली असून रब्बी हंगामात त्याची टंचाई जाणवणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.



सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला
. त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.






दरम्यान
, राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथे पंचनामे तत्काळ पूर्ण करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई वेळेवर देण्यासाठी प्रशासनाने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर असून यावर्षी त्यामध्ये २२ टक्क्यांनी अपेक्षित वाढ होणार असून हे प्रमाण ६९.७२ टक्के एवढे होणार आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार आहे. रब्बी पिकांसाठी १० लाख, ९२ हजार, ७६३ क्विंटल बियाणे उपलब्ध असून वाढीव क्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या बियाणांच्या उपलब्धतेसाठी महाबीजमार्फत खरेदी केली जाईल.

 

@@AUTHORINFO_V1@@