मुंबई : भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पाडण्याच्या नादात शिवसेनेने शपथविधीचा प्रोटोकॉल पाळला नसल्याने राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंचावरील सर्व व्यवस्था शिवसेनेने केली होती. प्रशासकीय यंत्रणांना त्यात हस्तक्षेप करू न दिल्याने मंचावर अव्यवस्था असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहीनीने सुत्रांच्या हवाल्यानुसार ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी शिवतीर्थावर पार पडला. या सोहळ्याला विशेष अतिथींनी उपस्थिती लावली होती. मात्र, यामुळे मंचावर झालेल्या गोंधळामुळे तसेच नेत्यांनी शपथविधी घेताना जाहीर केलेल्या नावांमुळे शपथविधी सोहळ्यात वेगळी प्रथा पडल्याचे राज्यपालांनी सांगितले. असा शपथविधी प्रोटोकॉलच्या विरोधात आहे, अशामुळे शपथविधी सोहळ्याची प्रतिष्ठा खालावली, असे राज्यपालांचे म्हणणे आहे.