नवी दिल्ली : संजय राऊत यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. राऊत यांच्या सुरक्षेसाठी आता ११ जवान तैनत असणार आहेत. संजय राऊत यांनी कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारचे अभिनंदन करत असतानाच पाकिस्तानविरोधी वक्तव्य केले होते. यानंतर राऊत यांच्या निषेधार्थ पोस्टर पाकिस्तानात लावण्यात आले होते.