आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |


थायलंडमध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या २१ व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदके पटकावली. मिश्र दुहेरीच्या कंपाउंड प्रकारात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीने यी चेन-ची चेन या जोडीचा आज अंतिम फेरीत १५८-१५१ असा पराभव केला.

पुरुषांच्या सांघिक कंपाउंड प्रकारात मात्र भारताच्या अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या अग्रमानांकित त्रिकुटाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाच्या संघाने त्यांचा २३३-२३२ अशा एका गुणाने निसटता पराभव केला.

महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारातही दक्षिण कोरियाच्या संघाकडून २३१-२१५ असा पराभव झाल्यामुळे, ज्योती- मुस्कान किरार-प्रिया गुर्जर या भारतीय त्रिकुटाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली.

@@AUTHORINFO_V1@@