नथुरामला देशभक्त बोलणारे उद्धव ठाकरे राहुल गांधींना चालतात का ? : भाजप प्रवक्ते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : "उद्धव ठाकरे 'सामना'चे संपादक असताना त्यांनी नथुराम हा देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्यासोबतच आज महाराष्ट्रात तुमचे सरकार स्थापित होत आहे. आज शपथविधी होत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांचा ढोंगीपणा थांबवावा", अशी टीका भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी राहुल गांधींवर केली आहे.


 

 

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीतून बाहेर काढण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना हा संसदेच्या दिवसातील काळा दिवस आहे, असे ट्विट केले. मात्र, भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. ज्यावरून तुम्ही टीका करत आहात. त्या नथुरामला उद्धव ठाकरे संपादक असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रात ही बाब छापून आली होती. त्यांना तुम्ही आज तुमच्या मदतीने महाराष्ट्रात शपथ घेत आहेत, हे तुम्हाला चालतात का ?, असा प्रश्न त्यांनी विचारला.



 

दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधीसाठी सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, सोनिया गांधी यांच्या या निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेसचे नेते या शपथविधीला येणार का याकडेही राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.




 

@@AUTHORINFO_V1@@