नवी दिल्ली : "उद्धव ठाकरे 'सामना'चे संपादक असताना त्यांनी नथुराम हा देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्यासोबतच आज महाराष्ट्रात तुमचे सरकार स्थापित होत आहे. आज शपथविधी होत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी त्यांचा ढोंगीपणा थांबवावा", अशी टीका भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी राहुल गांधींवर केली आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधीसाठी सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, सोनिया गांधी यांच्या या निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेसचे नेते या शपथविधीला येणार का याकडेही राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.