भाजपच्या खांद्यावर बसूनच शिवसेनेने मिळवले यश : रवीशंकर प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : 'भाजपच्या खांद्यावरच बसून शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवले.' अशी टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बुधवारी ते बोलत होते. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून सर्वात मोठा पक्ष भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक खेळी रचल्या." असेदेखील त्यांनी सांगितले.

 

झारखंडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर टीका केली. "महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला बहुमत दिले होते. तर हरियाणात भाजपला जनतेने कौल दिला. यानंतर भाजपने जेजेपीसोबत मिळून सत्ता स्थापित केली. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास तेथे जनतेने युती सरकार सत्तेवर आणण्यासाठी मतदान केले होते. तरीही दुसरी आघाडी सत्ता स्थापित करत आहे. अशा आघाडीला केवळ संधीसाधूपणाचा कळस म्हणता येईल." असे केंद्रीय मंत्री प्रसाद म्हणाले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@