उद्धव ठाकरे बनणार 'महाविकासआघाडी'चे नेते !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



मुंबई : राज्यातील सत्तापेचाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता नवे वळण मिळाले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आता बुधवारी सायंकाळचा वेळ दिला जाणार आहे. त्यानुसार, महाविकासआघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे आता नक्की मानले जात आहे.

 

न्यायालयाने बहुमतचाचणीबद्दल कल दिल्यानंतर आता महाविकासआघाडीने राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार, व्युहरचना आखली जात आहे. राज्यातील या बहुपक्षीय नेत्यांचे नेतृत्व करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला संमती देण्यात आली आहे. मंगळवारी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय़ झाल्याचे बोलले जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@