"जनतेने 'भगवा' फडकवला मात्र, उद्धव यांनी तो पवार-सोनियांच्या चरणी ठेवला"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. जनतेने महाराष्ट्रात भगवा फडकवला मात्र, तोच भगवा उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या चरणी ठेवून जनादराचा अपमान केला, असे मत तावडे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राजभवनावर ते उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी बोलतांना त्यांनी प्रतिक्रीया दिली.

 

राज्याला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला अपयश आले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपयशी असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाविकासआघाडीच्या सरकारला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी एकत्र येत घेतलेला हा निर्णय त्यांच्यावरच उलटणार असल्याची टीकाही फडणवीस यावेळी केली आहे. राज्यात भाजपला थोपवण्यासाठी प्रखर विरोधकांनी ज्या प्रकारे एकत्र येत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार त्यांचे सरकार फारकाळ टीकणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

 

"राज्याने ज्या प्रकारे गेल्या पाच वर्षांत विकासाचा धडाका पाहीला त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारचा मोठा वाटा आहे.", असे फडणवीस म्हणाले. राज्याला मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त मदत आणि प्रक्लप आणण्यात फडणवीस सरकारला यश मिळाले आहे. मात्र, आता राज्यात भाजपचे सरकार नसल्याने त्याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो, अशीही शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील सरकार स्थापन होणार आहे. मात्र, अजित पवारांची भूमीका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 
@@AUTHORINFO_V1@@