?
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी ३.३० वाजता आपल्या पदाचा राजीमाना देत असल्याचे जाहीर केले. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने पुरेसे संख्यापळ भाजपकडे नसल्याने मी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, "जे कधीच ठरले नव्हते त्या गोष्टींची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. जे कधीच ठरले नव्हते त्याची मागणी शिवसेनेने केली. नंबर गेम हा लक्षात आल्यानंतर शिवसेनेने आपले जागांचे बलाबल दाखवत आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगितले. 'मातोश्री'वरून कधीही बाहेर न पडणारे शिवसेना नेते आता अनेकांच्या पायऱ्या झिजवत होते. आमच्याकडून चर्चेची मागणी होत असताना आमच्याकडे कुठल्याही प्रकारची चर्चा न करता नव्या पक्षांची सुत जुळवण्यासाठी प्रयत्न केला गेला. त्यामुळे आम्ही बहुमत सिद्ध करू शकत नाही त्यामुळे मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. "