राज्यात सरकार स्थापनेची संधी द्या : जयंत पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |



मुंबई : राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना या तिन्ही पक्षांना सरकार स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी आज महाविकास आघाडीतील नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांनी राजभवनात पत्र सोपवले. १६२ आमदारांची परेड करण्यासाठी आम्ही तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सध्या राज्यपाल हे नवी दिल्ली येथे असल्याने त्यांनी केवळ कार्यालयात हे पत्र सादर केले आहे.

 

शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेल्या शपथेला त्यांनी विरोध केला. पुरेसे संख्याबळ नसल्याने सरकार स्थापण्यासाठी आम्हाला संधी द्यावी, अशी मागणी नेत्यांनी या पत्रात केली आहे. पुरेसे संख्याबळ नसल्याने फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नसल्याचा दावा करत सर्व आमदारांच्या समर्थकांचे पत्रही त्यांनी सोबत जोडले आहे.



@@AUTHORINFO_V1@@