मुंबई : भाजपा सरकार विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी दाखल केलेल्या याचिवेवर आज सकाळी १०:३० वाजता सुनावणी सुरु झाली. तर याचवेळी दुसरीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. छगन भुजबळांच्या भेटी नंतर तडक मंत्रालयाकडे रवाना होत अजित पवारांनीही उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.
महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सत्तास्थापनेच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.