मुंबई : सध्या सोशल मीडियावर अजित पवारांना दिलासा देण्यासंदर्भातील एक पत्रक फिरत असून कथित सिंचन गैरव्यवहार प्रकरणातील पवारांशी संबंधित फाईल बंद झाली असल्याचा आरोप बऱ्याचजणांकडून केला जात आहे. मात्र, या सिंचन गैरव्यवहार प्रकरणाशी अजित पवारांचा थेट संबध नसल्याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील कथित गैरव्यवहाराची उघड चौकशी पुराव्या अभावी केली जाणार नसून जोपर्यंत सबळ पुरावे येत नाहीत तोवर ही चौकशी अंतर्गत करण्यात येईल, किंबहूना गरज भासल्यास पुन्हा सुरू केली जाणार आहे.
सिंचन घोटाळ्यातील पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचा थेट त्याचा आरोप अजित पवार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. भाजप आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापन केली आहे. त्यानंतर आता अजित पवारांभोवती राजकारण फिरत असताना एक नवीन बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ९ फाईल बंद करण्यात आले आहेत. या ९ प्रकरणांचा अजित पवारांशी संबंध नसल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीजी परमबीर सिंग यांनी माहिती दिली की, "आम्ही सिंचन घोटाळ्यासंबंधित तक्रारींमध्ये सुमारे ३००० निविदांचा तपास करत आहोत. ही नेहमीच्या चौकश्या बंद करण्यात आल्या आहेत, पण चालू यापूर्वी सुरू असलेल्या चौकश्या तशाच सुरू राहतील. बंद झालेल्या कोणत्याही खटल्यांचा संबंध अजित पवार यांच्याशी नाही." याबाबत भाजपच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील स्पष्टीकरण दिले की, "सिंचन घोटाळ्याचे प्रकरण न्याप्रविष्ठ आहे. यात कोणलाही हस्तक्षेप करता येत नाही. अजित पवार यात आरोपी आहेत, दोषी नाही. त्यामुळे भाजपने अजित पवारांना दिलासा देण्यासाठी यात हस्तक्षेप करुन फाईल बंद करण्यास सांगितल्या, या सर्व बातम्यांना काही अर्थ नाही."